Website of Vasai, Virar

  • Full Screen
  • Wide Screen
  • Narrow Screen
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
 

New Beach Resort ....

विरार - नालासोपारा पाण्याखाली

E-mail Print PDF
User Rating: / 3
PoorBest 
बुडाली बुडाली बुडाली वसई विरार महापालिका बुडाली
जय हो वसई विरार महानगरपालिका
जय हो माजी नगरपरिषदा
जय हो आजी माजी नगरसेवक
जय हो CIDCO आणि MMRDA
जय हो आयुक्त आणि प्रशासक
जय हो महापौर
जय हो पश्चिम रेल्वे
जय हो विकासवाले
आणि धन्य हो जनता
विरार - नालासोपारा पाण्याखाली - तथाकथित विकासकांना निसर्गाची चपराक
वसई विरार परिसरात काल संध्याकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाने विरार व नालासोपारा शहरांत पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नालासोपारा पूर्व भागातील सर्व अनअधिकृत चाळी पूर्णतः पाण्याखाली बुडाल्या आहेत तर अनेक इमारतींचा खालचा मजला ५-६ फुट बुडाला आहे. विरार व नालासोपारा मध्ये रुळावर पाणी भरल्याने  विरारहून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सर्व गाड्या १ तास उशिराने धावत होत्या. पुढच्या २४ तासात जर पावसाचा जोर असाच राहिला तर विरार वसई पासूनची रेल सेवा पूर्णपणे  ठप्प होण्याची शक्यता आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने लोकांचे अतोनात हाल होत आहेत तसेच अनेकांच्या घरातील सामानांचे नुकसान झाले आहे.
CIDCO & येथील नगरपरिषदांच्या गलथान व भ्रष्टाचारी कारभारामुळे निर्माण झालेल्या हजारो अनधिकृत बांधकामांतून येथील जनतेवर ही परिस्थिती  ओढवली आहे. डोंगर फोडून प्रचंड प्रमाणत झालेल्या मातीच्या भरावामुळे सर्व नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत व त्यामुळे पूर्वेकडील डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने हा संपूर्ण परिसर ४-६ फुट पाण्याखाली गेला आहे. त्याच प्रमाणे नालासोपारा व विरारच्या पश्चिमेस रेलवेने उभारलेला कारखानाही ह्या पुरास
जबाबदार  आहे असे येथील जानकरांचे  मत आहे. नजीकच्या काळात हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती नागरिकांत व्यक्त केली जात आहे. येथील तथाकथित विकासकांनी अवलंबिलेल्या अनियोत बांधकाममुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे  ह्या सर्व भरावाचा संपूर्ण ताण वसई विरारच्या हरित पत्त्यावरही पडत आहे. ह्या ठिकाणीही अनेक भागात पाणी साचल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे व त्यामुळे अनेक बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
मागील २० वर्षापासून येथील भूमिपुत्र ह्या अनियोजित विकासाच्या  विरोधात अनेक आंदोलने करीत राहिला परंतु येथील प्रस्थापितांनी व काँग्रेसी सरकारांनी त्यांच्या तोंडाला फक्त पानेच पुसली. ज्या शरद पवारांनी ह्या भागाचा विकास करण्यासाठी १९९० मध्ये  स्थानिकांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता  CIDCO लादली त्यांच्याच कॉंग्रेस सरकारने नवीन महानगरपालिकेच्या सत्ताधार्यांच्या प्रेमापोटी CIDCO ला रातोरात रामराम ठोकला. सत्ता आणि पैश्याच्या लालसेपायी येथील प्रस्थापित व सरकार वसई विरार परिसराला एक दिवस अरबी समुद्रात तिलांजली दिल्याशिवाय राहणार नाही.
एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाही......
स्थानिकांना विचारात न घेता महापालिका लादण्याचा निर्णय रातोरात होतो. पुढे जावून आणखीन २ गावे महापालिकेत रातोरात समाविष्ट केली जातात, CIDCO ची रातोरात हकालपट्टी केली जाते...पण जनतेच्या आक्रमक विरोधानंतर गावे वगळण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात?....आणि त्यासाठी  तब्बल १ वर्ष लागावे?
नक्की सरकार कोणासाठी काम करते? जनतेसाठी कि जनतेने निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधीसाठी?
विजय मच्याडो

तलावांचा लिलाव ग्रामस्थांनी रोखला

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

वटार गावातील चार तलावांचा लिलाव वसई-विरार महापालिकेने जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी उपायुक्तांच्या उपस्थितीत लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर येथे जमलेल्या ग्रामस्थांनी ही प्रक्रिया बंद पाडली. महापालिकेतून गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जोपर्यंत गावे वगळली जात नाहीत तोपर्यंत हा लिलाव करू नये, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

प्रभाग क्रमांक ९ मधील वटार ग्रामपंचायत हद्दीतील दोन तलाव, वरळी तलाव, भोंगाळे तलाव, वरमाळे तलाव या तलावांचा महापालिकेने मासळी सोडणे व मारणे यासाठी २०१०-११ या वर्षासाठीचा लिलाव जाहीर केला होता. लिलावाच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ९ जण वटार येथील सध्याच्या पालिकेच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते. साडेबारा वाजता उपायुक्त देविदास टेकाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस नगरसेविका ज्योती ठाकूर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आपले उपायुक्तांकडे म्हणणे मांडले.

Read more...

Nirbhay Aandolan - May 10 / June 10

E-mail Print PDF

निर्भय आंदोलन - मे २०१०

Click here to download the PDF.

 

निर्भय आंदोलन - जून २०१०

Click here to download the PDF.

 

कृपया आपल्या प्रतीक्रिया  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it ह्या ईमेल वर पाठवा. आम्ही त्या श्री. मनवेल तूस्कानो ह्यांना पाठवू.

रणधुमाळी निवडणुकीनंतरची

E-mail Print PDF


वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार, हा मान चारपैकी कोणत्या शहरात की गावात जाणार, याची उत्सुकता वाढलेली असतानाच, विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. जनआंदोलन समितीमधून विनायक निकम यांचे नाव चचेर्त आहे.

विरोधी पक्षांत सर्वाधिक जागा जनआंदोलन समितीच्या आल्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांचाच होणार आहे. निकम हे आमदार विवेक पंडित यांचे नजिकचे सहकारी मानले जातात. नवघर-माणिकपूर शहरात त्यांनी याआधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले होते. जनआंदोलन समितीच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेतही गटनेतेपदावरून शिरीष चव्हाण व वसंत वैती यांच्यात चुरस होणार आहे. चव्हाणांकडे जिल्हाप्रमुख हे पद असल्याने पुन्हा त्यांना गटनेते पद मिळते का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काँग्रेसच्या दोन नगरसेविका असून त्यात जो अधिक प्रभावीपणे काम करेल त्याकडे हे पद जाणार आहे. भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक नगरसेवक विजयी झाले आहेत. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात कोण बाजी मारते, हे लवकरच स्पष्ट होईल.

नगरसेवक लागले कामाला!


चारही शहरे व परिसरातील बविआच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या त्या-त्या क्षेत्रीय ऑफिसमध्ये जाऊन नालेसफाईसहित अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोमवारी उपायुक्तांसोबत चर्चा केली. गरज पडल्यास बविआचे आमदार, खासदारही आयुक्तांची भेट घेणार आहेत.

अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याने त्या-त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी उपायुक्तांशी चर्चा केली. नाले-गटारसफाईचा विषय गंभीर आहे, त्या नालासोपाऱ्यात अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. कचऱ्याचे ढीग स्वच्छ करा, तंुबलेली गटारे स्वच्छ करा, असे सांगून नगरसेवकांनी कामांचा आढावा घेतला. आचारसंहितेमुळे ज्या कामांचे कार्यादेश अडले होते ते त्वरित देऊन कामे सुरू करण्याचीही सूचना आली. लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी नारायण मानकर यांनी केली.

काँग्रेस उमेदवारांचा सत्कार

वसई-विरार महापालिका निवडणुकीत बीना फुटर््याडो व छाया पाटील या काँग्रेसच्या दोन उमेदवार विजयी झाल्या. वसई काँग्रेस कमिटीच्या वतीने या नगरसेवकांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा, आमदार गावीत, ठाणे शहर काँग्रेसचे बाळ पूणेर्कर उपस्थित होते.

जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात गेली असून त्या तुलनेत सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. लोकहितासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहन बाळ पूणेर्कर यांनी केले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर समीर वर्तक यांनी आभार प्रदर्शन केले.

Page 1 of 6

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  Next 
  •  End 
  • »
You are here: Home