Website of Vasai, Virar

  • Full Screen
  • Wide Screen
  • Narrow Screen
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
 

Send Gifts, Flowers to Vasai Virar

रणधुमाळी निवडणुकीनंतरची

E-mail Print PDF
User Rating: / 0
PoorBest 


वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार, हा मान चारपैकी कोणत्या शहरात की गावात जाणार, याची उत्सुकता वाढलेली असतानाच, विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. जनआंदोलन समितीमधून विनायक निकम यांचे नाव चचेर्त आहे.

विरोधी पक्षांत सर्वाधिक जागा जनआंदोलन समितीच्या आल्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांचाच होणार आहे. निकम हे आमदार विवेक पंडित यांचे नजिकचे सहकारी मानले जातात. नवघर-माणिकपूर शहरात त्यांनी याआधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले होते. जनआंदोलन समितीच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेतही गटनेतेपदावरून शिरीष चव्हाण व वसंत वैती यांच्यात चुरस होणार आहे. चव्हाणांकडे जिल्हाप्रमुख हे पद असल्याने पुन्हा त्यांना गटनेते पद मिळते का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काँग्रेसच्या दोन नगरसेविका असून त्यात जो अधिक प्रभावीपणे काम करेल त्याकडे हे पद जाणार आहे. भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक नगरसेवक विजयी झाले आहेत. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात कोण बाजी मारते, हे लवकरच स्पष्ट होईल.

नगरसेवक लागले कामाला!


चारही शहरे व परिसरातील बविआच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या त्या-त्या क्षेत्रीय ऑफिसमध्ये जाऊन नालेसफाईसहित अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोमवारी उपायुक्तांसोबत चर्चा केली. गरज पडल्यास बविआचे आमदार, खासदारही आयुक्तांची भेट घेणार आहेत.

अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याने त्या-त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी उपायुक्तांशी चर्चा केली. नाले-गटारसफाईचा विषय गंभीर आहे, त्या नालासोपाऱ्यात अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. कचऱ्याचे ढीग स्वच्छ करा, तंुबलेली गटारे स्वच्छ करा, असे सांगून नगरसेवकांनी कामांचा आढावा घेतला. आचारसंहितेमुळे ज्या कामांचे कार्यादेश अडले होते ते त्वरित देऊन कामे सुरू करण्याचीही सूचना आली. लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी नारायण मानकर यांनी केली.

काँग्रेस उमेदवारांचा सत्कार

वसई-विरार महापालिका निवडणुकीत बीना फुटर््याडो व छाया पाटील या काँग्रेसच्या दोन उमेदवार विजयी झाल्या. वसई काँग्रेस कमिटीच्या वतीने या नगरसेवकांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा, आमदार गावीत, ठाणे शहर काँग्रेसचे बाळ पूणेर्कर उपस्थित होते.

जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात गेली असून त्या तुलनेत सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. लोकहितासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहन बाळ पूणेर्कर यांनी केले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर समीर वर्तक यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Poll

Are you comfirtable with phone/email invitations?





Results
You are here: News Political रणधुमाळी निवडणुकीनंतरची